अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्ती; अशोक गायकवाडांनी वाचविले मुक्या प्राण्यांचे प्राण! धम्मविचारांच्या वारसदारामुळे एका कुटुंबासह संपूर्ण गाव पडले वैचारिक परिवर्तनाच्या वाटेवर पैठण तालुका प्रतिनिधी : प्रकाश निकाळजे पैठण: "जो तोडलेले जोडू शकत नाही, त्याला तोडण्याचा अधिकार नाही," हा तथागत भगवान बुद्धांनी अंगुलीमालाला दिलेला उपदेश आजही समाजासाठी तितकाच जिवंत आहे. पुण्याच्या एका कुटुंबाने अंधश्रद्धेपोटी घेतलेला प्राण्यांच्या बळीचा निर्णय, एका धम्मनिष्ठ व्यक्तीच्या वेळीच केलेल्या प्रबोधनामुळे बदलला आणि त्यातून जन्माला आला एक नवा अहिंसक विचार. अंगुलीमाल ते आधुनिक अंधश्रद्धा कधीकाळी जंगलात हिंसा करणाऱ्या अंगुलीमालाचे परिवर्तन बुद्धांच्या शब्दांनी केले होते. आजच्या आधुनिक युगातही, शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरासारख्या ठिकाणी राहणारी सुशिक्षित माणसे जेव्हा नवसापोटी मुक्या प्राण्यांचा बळी देण्यास निघतात, तेव्हा बुद्ध विचारांची गरज पुन्हा एकदा अधोरेखित होते. अशीच एक सत्यघटना नुकतीच पैठण परिसरात घडली. नेमकी घटना काय? पुणे येथे स्थायिक असलेल्या एका 'लव्हे' क...